जागर फौंडेशनचा 'आयुष्मान भारत कार्ड' अभियान रविवारी बचत भवनमध्ये शिबिर.आ. विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते उद्घाटन.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- जत येथील जागर फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व मा. बांधकाम सभापती परशुराम मोरे यांच्या वतीने "आयुष्मान भारत कार्ड" अभियान सुरू आहे. रविवार ५ मार्चला सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील नागरिकांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे यांनी केले आहे. येथील बचत भवनमद्ये राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचे उदघाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
परशुराम मोरे म्हणाले, केंद्र सरकारने सुरु केलेल्या ही योजना गरजू व गोर गरीब जनतेच्या हिताची आहे. त्याचा लाभ जत शहरातील नागरिकांना व्हावा यासाठी जागर फाऊंडेशनचे सदस्य काम करीत आहेत. हे अभियान परशुराम मोरे यांच्या कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. शहरातील गोरगरीब व सामान्य कुटुंबातील लोकांना सरकारच्या योजनेचा लाभ व्हावा यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. आमच्या कुंटुबाला समाजसेवेचा वारसा आहे. आमचे वडील शहरातील गोरगरीब व वंचीत घटकातील समस्या ह्या स्वतःच्या मानून त्या सोडवण्यासाठी काम करीत राहिले. त्यांचे स्वप्न उराशी बाळगून मी काम करीत आहे."आयुष्मान भारत कार्ड"अभियान शहरात सुरू केले आहे. यासाठी शहरातील आमच्या विचाराचे व जागर फाऊंडेशनचे सदस्य काम करीत आहेत. यासाठी लागणारी आवश्यक ती सर्व माहिती व यंत्रणा आहे. याचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा असे आव्हान संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांनी केले आहे
Comments
Post a Comment