निरंकारी मिशनमार्फत देशभरात आयोजित 272 रक्तदान शिबिरांत उत्साहपूर्ण रक्तदान.


सागंली शहरातील रक्तदान शिबिरात 175 यूनिट रक्त संकलित
आपले जीवन सदोदित मानवतेच्या सेवेमध्ये समर्पित असावे
दिव्यराज न्युज जत प्रतिनिधी :- सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज २५ एप्रिल, २०२२ – मानव एकता दिवसानिमित्त रविवार, दि.२४ एप्रिल, २०२२ रोजी संत निरंकारी मिशनमार्फत देशभरात आयोजित करण्यात आलेल्या २७२ रक्तदान शिबिरांमध्ये निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले असून जवळपास ५० हजार यूनिट रक्त संकलित करण्यात आले आहे.
    या महा रक्तदान अभियानामध्ये भाग घेत संत निरंकारी सत्संग भवन  सांगलीयेथे मिशनच्या स्थानीक शाखेकडून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये175  निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्त संकलन करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल मिरज व वसंत दादा रक्त पेढी सांगली रक्तपेढीने आपली/आपल्या टीम पाठविल्या होत्या.
देशभरात आयोजित करण्यात आलेल्या या महा रक्तदान अभियानाचा शुभारंभ सद्गुरु माता
सुदीक्षाजी महाराज यांनी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथून केला.
     याप्रसंगी झूम ॲपच्या माध्यमातून सद्गुगुरु माताजींनी सर्व शिबिरांना सामूहिक रूपात आपले आशीर्वाद प्रदान करताना म्हटले, ‘‘आपले जीवन सदोदित मानवतेच्या सेवेमध्ये समर्पित राहील या भावनेतून आपण जीवन जगायचे आहे.’’ की सेवा में प्रतिपल समर्पित हो हमारा जीवन, ऐसी ही भावना से युक्त जीवन हम सभी ने जीना है’
सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की बाबा गुरबचनसिंहजी यांचे जीवन व शिकवण यांमधून
प्रेरणा घेत आपण मानवतेच्या सेवेमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान द्यायचे आहे. याशिवाय सद्गुरु
माताजींनी बाबा हरदेवसिंहजी यांच्या महान शिकवणूकीचाही उल्लेख केला, की रक्तदानाच्या
माध्यमातून आपण मानवतेच्या सेवेत बहुमूल्य योगदान देऊन अनेकांचे प्राण वाचवू शकतो. एखाद्या
शारीरिक कारणाने आपण रक्तदान करु शकत नसलो तरी रक्तदान करण्याची आमची मनोमन इच्छा असेल तरीही ती भावना स्वीकार्य आहे.
युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांनी आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून विश्वबंधुत्व आणि एकोप्याचा संदेश जगभरात दिला. त्याबरोबरच समर्पित गुरु-भक्त महान सेवादार चाचा प्रतापसिंहजी व अन्य भक्तांचेही या दिवशी आपण स्मरण करतो, ज्यांनी मानवतेच्या भल्यासाठी आपल्या
   प्राणांचेही बलिदान दिले. ‘मानव एकता दिवस’ प्रसंगी मिशनकडून दरवर्षी २४ एप्रिल रोजी संपूर्ण
देशात सत्संगाचे कार्यक्रम आयोजि केले जातात शिवाय वर्षभर चालत राहणाऱ्या रक्तदान शिबिरांच्या विशाल श्रृंखलेचाही प्रारंभ केला जातो.
समालखा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सद्गुरु माताजींचे जीवनसाथी
आदरणीय रमित चानना जी यांनी स्वत: रक्तदान करुन मानवतेच्या सेवेमध्ये आपले महत्वपूर्ण
योगदान दिले आणि सर्वांसाठी प्रेरणास्रोत ठरले. हे सर्वविदित आहे, की संत निरंकारी मिशन नेहमीच
मानवी मूल्यांचे रक्षण करण्यासाठी केलेल्या सेवांबद्दल प्रशंसेस पात्र बनून राहिले असून कित्येक राज्यांकडून सन्मानित केले गेले आहे. जनकल्याणासाठी या सेवा निरंतर जारी आहेत.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन