सांगली कृ.उ.बा.स. निवडणुकीत भाजपला मत मागण्याचा अधिकार नाही.भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तथा सरपंच परिषद जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांचा भाजपला घरचा आहेर!

दिव्यराज न्युज जत :- 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन भाजप ने दिले होते. 
वास्तविक पाहता याच भाजप सरकारने वेळोवेळी आयात आणि निर्यात धोरणात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू दिला नाही. सोयाबीन आणि तुरीचे आयात करून ऐन सुगीच्या दिवसात शेतमालाचे भाव गेल्या दहा वर्षात वारंवार पडले आहेत. या उलट कृषिनिविष्ठांवर प्रचंड जीएसटी लावून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. डिझेल चे भाव शंभर रुपये करून शेतकऱ्यांवर बोजा टाकला आहे. 
भाजप च्या सर्व धोरणांचा लक्ष उद्योगपती मित्रांना लाभ पोहंचवण्याचा आहे. शेतकऱ्यांची मतं मिळवण्यासाठी सांप्रदायिक ध्रुवीकरण करून दिशाभूल केली जात आहे.
   तीन कृषी कायदे करून याच कृ. उ. बा. स. निकालात काढण्याचा कट रचण्यात आला होता. परंतु शेतकरी आंदोलनाच्या रेट्या पुढे त्यांना नमतं घ्यावं लागलं. नाहीतर कृषीमालाच्या संपूर्ण बाजारपेठ खाजगी क्षेत्राच्या घश्यात घालण्याचा यांचा मानस होता. हे सर्व शेतकऱ्यांनी पाहिलं आहे. आज कोणत्या तोंडाने हे लोक शेतकऱ्यांच्या दारात उभे आहेत हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. गावागावात यांच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या शिव्या खाव्या लागत आहेत. 
येणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालातून शेतकऱ्यांचा रोष दिसणार आहे. त्यामुळे सर्व भाजप पुरस्कृत पॅनल आपापलं गाठोडं घेऊन पळ काढण्याच्या बेतात आहेत. 
  शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडी पुरस्कृत वसंतदादा शेतकरी विकास आघाडी पॅनेल विजयी होईल हे आता स्पष्ट झाले आहे. असे प्रतिपादन बसवराज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृतीची गरज: - डॉ. मधुकर बाचुलकर