श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना तातडीने धावणार अपघातग्रस्तांचा मदतीला, तुकाराम बाबा महाराज यांचा उपक्रम.
दिव्यराज न्युज नेटवर्क :- (राजू ऐवळे) कोरोना, दुष्काळ, महापूर, घर जळालेली घटना असो की जत पूर्व भागातील वंचित ६५ गावाला म्हैसाळचे पाणी मिळविण्यासाठीचा लढा असो, रस्त्यावर एखादी अपघाताची घटना घडो मदत नव्हे कर्तव्य मानून कायम समाजसेवेसाठी कार्यतत्पर असलेले चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना ही निरपेक्ष भावनेने कायम सामाजिक कार्यात कार्यमग्न असते.
जत तालुक्यातील वाढत्या अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेने स्वखर्चाने तीन रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेला अपघाताची माहिती मिळताच मानव मित्र संघटनेची रुग्णवाहिका अपघात ज्या ठिकाणी घडला आहे तेथे तात्काळ पोहचेल व अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी निशुल्क पोच करेल. हभप तुकाराम बाबा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ २१ मे रोजी तुकाराम बाबा महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला.
यावेळी धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा शिवाजीराव काळुंगे, हभप एकनाथ महाराज पंढरपूर, हभप पात्रे महाराज निंबोनी, अमोल डफळे, मोहनभैय्या कुलकर्णी, संजय धुमाळ,अजित कारंडे, प्रशांत कांबळे, रामदास भोसले
अमृत पाटील महाराज जल्याळ
बसू तेली , भारत क्षीरसागर, राजू सलगर, सुरेश माडग्याल , राजू पुजारी, सरिताताई लिंगायत, विलास दोरकर, रणशिंगे सर , प्रतिभा रणशिंगे डॉ.आर .के. पाटील, सुभाष पाटील, रामलिंग मेढेदार ,ऋषी दोरकर, पिंटू मोरे, व्यंकटेश राजपूत, संतोष चेळेकर, महेश भोसले , चान्नपा आवटी आदी उपस्थित होते.
■ मदत नव्हे कर्तव्य मानून करणार सेवा- तुकाराम बाबा
जत तालुक्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. तालुक्यात वाहनांची संख्या मोठी वाढली आहे. तालुक्यात वाढत्या अपघाताच्या घटना चिंताजनक आहेत, अनेकांना वेळेत रुग्णालयात दाखल न करता आल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातग्रस्तांना यापूर्वी सुद्धा मानव मित्र संघटनेने मदत करून अनेकांना जीवदान दिले आहे. अपघातातील जखमींना आपण स्वतः आपल्या गाडीतून रुग्णालयात पोहचवले आहे. विस्ताराने मोठा असलेल्या तालुक्यात अपघाताची घटना घडल्यानंतर तात्काळ मदत करता यावी यासाठी मानव मित्र संघटनेकडून तीन रुग्णवाहिका २४ तास सज्ज राहणार आहेत. मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून अपघातग्रस्तांना मदत केली जाईल तेव्हा जतकरांनी सहकार्य करावे असे आवाहन हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.
Comments
Post a Comment