Posts

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

Image
दिव्यराज न्युज जत :- संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन रजिस्ट्रेशन दिल्ली शाखा जत यांचे वतीने साई प्रकाश मंगल कार्यालय जत येथे आयोजित रक्तदान शिबिरात १४५जणांनी उत्फुर्त सहभाग घेतला यामध्ये महिला वर्गाचेही प्रमाण मोठ्या संख्येने होते.      शिबीराचे उद्घाटन जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांचे हस्ते करण्यात आले त्यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली यावेळी बोलताना ते म्हणाले की "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे" सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सर्वांनी रक्तदान केले पाहिजे निरंकारी मंडळाचे कार्य महान आहे तेथील भक्त निस्वार्थी भावनेने सेवा करतात ते भेदभाव मानत नाहीत त्यांची शिकवण घेण्यासारखी आहे.आज वातावरणातील बदलामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले आहे ते जर कमी करायचे असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी वृक्षलागवड करून कमीत कमी त्याची तीन वर्षे संगोपन केले पाहिजे येणाऱ्या कालावधीत आपण सर्वांनी संकल्प करुया की येणाऱ्या जुन महिन्यात सर्वांनी झाडे लाऊन जोपासुया दरम्यानच्या कालावधीत त्यांनी निरंकारी प्रकाशन स्टालला भेट दिली त्यावेळी त्यांना मिशनचे साहित्य व सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांचा फो...

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

Image
दिव्यराज न्युज नेटवर्क जत प्रतिनिधी :-(राजू ऐवळे)संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन रजिस्ट्रेशन दिल्ली शाखा जत यांचे वतीने रविवार दिनांक २६ मे २०२४ रोजी साई प्रकाश मंगल कार्यालय जत येथे सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असलेची माहिती संयोजकानी दीली      सारी सृष्टी एका प्रभु परमात्म्याची निर्मीती आहे सर्वांचा देव परमात्मा एक आहे आणि तो सर्वांच्या घटामध्ये विराजमान आहे मानवाची सेवा‌ हीच ईश्वराची सेवा होय या समयाच्या निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे शिकवणीनुसार आध्यात्माबरोबर रक्तदान शिबीर वृक्ष लागवड,आरोग्य शिबीर,स्वच्छता अभियान,आपत्तीग्रस्तांना मदत कार्य पुरविणे यासारखे सामाजिक उपक्रम राबऊन मानवाची सेवा करीत आहेत.रक्तदान शिबिराची सुरवात सन १९८६ साली तत्कालीन सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी पहिल्यांदा स्वता रक्तदान करुन केली आतापर्यंत जवळजवळ १३,८१,९०६ युनिटहुन अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदविलेला आहे वैज्ञानिकांनी सर्व गोष्टींमध्ये प्रगती केली पण विज्ञानाला रक्त तयार करता आले नाही म्हणून रक्तदान केले पाहिजे रक्तदा...

श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना तातडीने धावणार अपघातग्रस्तांचा मदतीला, तुकाराम बाबा महाराज यांचा उपक्रम.

Image
दिव्यराज न्युज नेटवर्क :- (राजू ऐवळे) कोरोना, दुष्काळ, महापूर, घर जळालेली घटना असो की जत पूर्व भागातील वंचित ६५ गावाला म्हैसाळचे पाणी मिळविण्यासाठीचा लढा असो, रस्त्यावर एखादी अपघाताची घटना घडो मदत नव्हे कर्तव्य मानून कायम समाजसेवेसाठी कार्यतत्पर असलेले चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना ही निरपेक्ष भावनेने कायम सामाजिक कार्यात कार्यमग्न असते.  जत तालुक्यातील वाढत्या अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेने स्वखर्चाने तीन रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेला अपघाताची माहिती मिळताच मानव मित्र संघटनेची रुग्णवाहिका अपघात ज्या ठिकाणी घडला आहे तेथे तात्काळ पोहचेल व अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी निशुल्क पोच करेल. हभप तुकाराम बाबा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ २१ मे रोजी तुकाराम बाबा महाराज यांच्या वाढदिवस...

13 मे हा दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभर “समर्पण दिवस” म्हणून साजरा केला जातो.

Image
दिव्यराज न्युज जत :- मानवता हाच खरा धर्म असून धर्म जोडण्याचे काम करतो, तोडण्याचे नव्हे असा उद्घोष करत अखिल विश्वातील मानवजातीला सत्य, प्रेम, दया, करुणा, सहनशीलता आणि अहिंसेची शिकवण देणारी दिव्य विभूति बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे जीवन मानवजातीसाठी महान वरदान होते. सर्वांचा परमपिता परमात्मा एकच असून आपण सारी त्याचीच लेकरं आहोत. त्या एकाला जाणले आणि मानले तर अवघी मानवजात एकत्वाच्या धाग्यात गुंफली जाऊ शकते आणि या धरतीचे स्वर्गात रुपांतर होऊ शकते असा त्यांचा ठाम विश्वास होता. मानवा-मानवामध्ये जात-पात, धर्म-सांप्रदाय, वर्ण-वंश, भाषा-प्रांत, देश-वेश अशा अनेकविध कारणांमुळे उभ्या राहिलेल्या भिंती सत्यज्ञानाने ढासळू शकतात आणि “World Without Walls” (भिंतीरहित विश्व) ही संकल्पना साकार होऊ शकते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करुन दाखवले.  जगामध्ये शांतीसुखाचे वातावरण स्थापन करण्यासाठी मानवाने हा सत्यसंदेश मनापासून स्वीकारायला हवा असा त्यांचा आग्रह होता. हा संदेश सर्वदूर पसरविण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा श्वास अन् श्वास खर्ची घातला. जगभर आध्यात्मिक कल्याणयात्रा केल्या आणि कोट्यावधी लोकांना सत...

कोळगिरी येथे मतदार जनजागृती अभियान अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन.

Image
दिव्यराज न्युज नेटवर्क :- (राजू ऐवळे) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले यामध्ये गावातील सर्व शासकीय कर्मचारी,आजी माजी सैनिक,आशा सेविका, अंगणवाडी सेविका,बचत गट प्रतिनिधी, पोलिस पाटील,यांची गावांमध्ये बैठक घेऊन गावातील सर्व मतदारांना मतदान‌ करण्यासाठी शासनाने दिलेल्या सुचनेनुसार विविध कार्यक्रम राबवून प्रवृत्त करण्याचे नियोजन करण्यात आले.यामध्ये महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, प्रभातफेरी,नवमतदारांचा व जेष्ठ मतदारांचा मेळावा,रन फॉर ओट असे विविध प्रकारचे उपक्रमाच्या माध्यमातून गावांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू असलेची माहिती जि.प.शाळा वळसंग केंद्राचे केंद्रप्रमुख नामदेव भोसले, ग्रामसेवक डी.एम.साळे यांनी दिली.यावेळी जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर,माळी सर,केंद्रे सर, कांबळे सर ,घाडगे मँडम,मोमीन मँडम, हायस्कूल चे मुख्याध्यापक सौ विणा हिरेमठ,राजेंद्र येळदरी,आनंदराव पांढरे,बिराप्पा पांढरे,नागाप्पा माळी, बसवराज सायगाव,तिप्पाना बुध्दीहाळ,माजी सैनिक विठ्ठल डिस्कळ,श्रीशैल सिध्दरेड्डी अंगणवाडी सेविका अनिता कांबळे, लक्ष्मीबाई नरुटे,बचत गट प्रति...

विठू गजरात, तुकाराम बाबांच्या उपस्थितीत पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना.

Image
दिव्यराज न्युज नेटवर्क जत प्रतिनिधी:- विठ्ठल नामाच्या गजरात चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थितीत चैत्रवारीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिक्कलगी भुयार ते पंढरपूर पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाला आहे. या दिंडीत १५ लाखाचा सागवानी रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रीय संत गाडगेबाबा, वैराग्यसंपन्न श्री संत बागडेबाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे तुकाराम बाबा महाराज यांनी २०१७ मध्ये चैत्र वारीला पायी दिंडी सुरु केली. मागील वर्षी चैत्र वारी पायी दिंडीत पुढील वर्षी संपूर्ण सागवानी रथ तयार करण्याचा मानस भक्तांनी व्यक्त केला.   भक्तांचा हा संकल्प पूर्ण झाला असून पंढरपूर येथे १५ लाखाचा सागवानी रथ बनविण्यात आला आहे. बागडेबाबांच्या भक्तांनी दिलेल्या देणगीतून १५ लाखाचा भव्य रथ तयार करण्यात आला आहे. संपूर्ण सागवानी असलेला हा रथ अतिशय आकर्षक बनविण्यात आला आहे. रथावर घोडे, हत्ती अन्य कोरीव काम करण्यात आले आहे. पंढरपूर येथील भारत काळे यांनी हा रेखीव रथ तयार केला आहे. ग...

जत येथील सोहन ठोंबरे यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची पीएच. डी.

Image
दिव्यराज न्युज नेटवर्क जत प्रतिनिधी :- (राजू ऐवळे) डी. वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या 'सेंटर फॉर इंटरडिसीप्लीनरी रिसर्च' चे विद्यार्थी सोहन श्रीमंत ठोंबरे यांना पदार्थविज्ञान या विषयातून विद्यापीठाकडून पीएच. डी. पदवी जाहीर झाली आहे. सोहन ठोंबरे यांनी पदार्थविज्ञान विद्याशाखेतून 'सिन्थेसिस अँड कॅरॅक्टराइडोशन ऑफ सिलिकॉन अँड कार्बन बेस्ड ऍनोडेस फॉर लिथियम आयन बॅटरीझ' या विषयावरील प्रबंध सादर केला होता. त्यांना डॉ. मनीषा फडतरे आणि रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. चंद्रकांत लोखंडे यांचे मार्गदर्शन मिळाले. सोहन या विद्यापीठातील लिथियम आयन बॅटरी विषयामधून पीएच. डी. करणारे प्रथम विद्यार्थी आहेत. त्यांच्या संशोधनानुसार पुढील कालावधीमध्ये बॅटरीसाठी लागणारी सिलिकॉन अँड सिलिका हि सामग्री तयार करण्यासाठी तांदळाचा टाकाऊ भुसा चा वापर करून त्याचा वापर हा ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी लिथियम आयन बॅटरी आणि लिथियम आयन कपॅसिटर मध्ये ऍनोडे सामग्री म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे बॅटरी ची आयन साठवण्याची क्षमता वाढेल व बॅटरी खूप वेळ चालेल. त्याचबरोबर जत येथील राजे रामराव कॉलेज चे प्राचार्य, सुरेश पाटील आ...